कोल्हापूरातील वाचनकटटा अंतर्गत सुरु
झालेल्या शिक्षक वाचनकटटा व्यासपीठाच्या
वतीने “आम्ही चाललो लेखकांच्या घरी” या उपक्रमाचे आयोजन शनिवार दि.२१ एप्रिल २०१८
रोजी आयोजन केले. यानिमित्ताचे जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
मा.श्री.इंद्रजीत देखमुख, मा.डॉ.बी.एम.हिर्डेकर व जेष्ठ साहित्यिक मा.डॉ.
सुनीलकुमार लवटे सर यांच्या घरी जाऊन संवाद साधला व ग्रंथसंपदा पाहिली. या
उपक्रमात ग्रामीण व शहरी भागातील 40 विदयार्थी व 15 शिक्षकांनी सहभाग घेतला.
यासाठी वाचनकटटा बहुउददेशीय संस्थेचे संस्थापक युवराज कदम, मुंबई क्षेत्रविकास
प्राधिकरणाचे अप्पर जिल्हाधिकारी मा. संजय पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेटके आयोजन झाले होते.